मुलगा म्हाताऱ्या आईला महालक्ष्मी मंदिराबाहेर सोडून पळून गेला, त्यानंतर त्या आईची अवस्था पहा..आपल्या मुला बाळांना हा लेख नक्की वाचयला द्या..

ट्रेंडिंग ठळक बातम्या

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती, ज्याच्यासाठी तीस रुपये महिन्याला द्यावे लागायचे , या सायकलीवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे एक म्हातारी बाई बसलेली असायची, चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून बसायची, त्यातच गोणपाट अंथरून बसायची, अंगावर एकदम जुनी साडी ती पण मळलेली, डोक्यावरची केस पुर्णपणे पिकले होते.

   

साधारण 70 ते 75 वय असावे. थंडीपासून बचावासाठी आजी काळी चादर वापरत होती. थंडीच्या दिवसात कायम अं’गावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनच ताट आणि एक स्टीलची वाटी एवढंच तीच साहित्य. एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो, तेव्हा तिने विचारलं, बाळ नाव काय तुझं?

नाव बोललो, कदाचित ते त्यांना समजलेच नाही? त्यांनी पुन्हा विचारलं? मग मी पुन्हा बोललो, नंतर त्या बोलल्या अच्छा छान आहे नाव , त्यांनी इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणत, नंतर सायकलीला अडकवलेला माझ्या डब्याकडे पाहून विचारलं त्यामध्ये काही शिल्लक आहे का? मी क्षणभर गोंधळलो, का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, मग मी नाही बोललो, तोच हसरा चेहरा करून बोलल्या,

काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा. हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण त्यांची मजबुरी होती. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही घेत असत, मी हो बोललो आणि घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं.

तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात दोन चपाती जास्त भरल्या आणि बोलली आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, आता गेल्यावर दे म्हणजे आत्ताच, लगेच खाऊन घेतील, मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

हे वाचा:   पुरुषांकडून फक्त हे एक सुख मिळवण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया.. ही गोष्ट जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल..एकदा पहाच..

दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक आठवण आली. एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी तो डबा आजीला दिला, मग त्या गोड हसल्या, त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढून त्याचे छोटे छोटे तु’कडे केले आणि थोडे दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकडा जवळ ठेवलं. मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. पुन्हा जवळ येऊन बसल्या.

मी विचारलं आजी काय करत आहे तुम्ही? त्या हसल्या आणि बोलल्या, इकडे तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या, मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि पळून गेली, कदाचित तो तुकडा आणखीन एखादा भुकेला पिल्लासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळा अनुभव आला.

मी माझ्या डब्यातून काही भाग आजीला दिला होता, आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्याना दिला आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग त्यांच्या पिल्लांसाठी नेला. कदाचित हे दुसऱ्यासाठी थोडसं सुख घेऊन जाणे असेल. जवळजवळ एक वर्ष असंच चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो. जॉब साठी. चांगला जॉब मिळाला. तेव्हा आवर्जून त्या आज्जीनंकडे पेढे घेऊन गेलो, त्यांनी त्यातला अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीने मला पेढा दिला यातच समाधान आहे.

हे वाचा:   मुकेश अंबानींना रस्त्यावरील हे पदार्थ खूपच आवडतात, महिन्याभरात खातात लाखो रुपयांचे चटपटीत पदार्थ....

माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणले आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू, मला प्रेमाने पेढा दिला, खूप समाधान वाटलं, खूप मोठा साहेब होशील तू , त्यांच्या पाया पडलो आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ,या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोप आहे म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्याच्या बदल्यात आपल्याला समाधान आनंद आशीर्वाद मिळून जातात. तरीही आपण दुसरीकडे शोधत बसतो.

यामध्ये वर्ष निघून गेलं, आता जॉब परमनंट झाला होता म्हणून थोड आजीला भेटण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या, त्यांचं साहित्य नव्हतं, फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती, मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं कुठे आहेत त्या आजी ? त्याने मला पाहिलं आणि बोलले त्या वारल्या, 2 महिने झाले, ऐकून खूप वाईट वाटल, मन सुन्न झालं जणू कोणीतरी जवळच गेलं होतं.

त्यांच्या वाटीकडे पाहिलं, कोरडी पडली होती, मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती पाण्याने भरले आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. सहज मागे वळून पाहिलं तर अनेक जण या पेढा खायला चिमण्या आल्या होत्या, पाणी पीत होत्या, मी आजींच्या झोपडीकडे पाहिले, आजी मात्र दिसत नव्हत्या. आजी मला जीवनाच फार मोठ वास्तव देऊन गेल्या, वाटल्याने ते वाढतं, मग ते प्रेम असो अथवा आनंद सुख दुसऱ्याला देणे हेच खरे जीवन !

Leave a Reply