विशेषतः ‘या’ दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची चूक अजिबात करू नका…अन्यथा आपल्या हातून खूप मोठे पाप घडेल !

अध्यात्म

तुळशी वृंदावन हे घरात असल्याने नकारात्मक विचार व गोष्टी नष्ट होतात. तसेच यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.त्यामुळे आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो. याशिवाय गरुड पुराणामध्ये ही या तुळशीचे महत्त्व सांगितले आहे,याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हटले जाते.

   

त्यामुळे, आपल्या हिंदू ध-र्मात फार पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते,म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळशी वृंदावन पहावयास मिळते, त्यामुळे अशा घरांवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते. याच तुळशीला आपण धा र्मिकदृष्ट्या मातेसमान मानतो, तसेच तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फा यदेही आपणास माहित आहे.

तसेच माता तुळशीच्या फक्त दर्शन आपली सर्व पापे नष्ट होत असतात,याशिवाय आपल्या विविध धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगतलेले आहे. परंतु हिंदू शास्त्रात माता तुळशी विषयक काही महत्वाचे नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन आपल्याला नक्कीच केले पाहिजे.कारण त्यामुळे आपल्या आणि आपल्याला कुटुंबावर माता तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद प्राप्त होईल.त्यामुळे अंगणातील तुळशीची पुजा करतेवेळी या काही चुका करू नये.

हे वाचा:   3 ते 5 या दरम्यान झोपमोड होते तर नक्की बघा हा लेख..काय असतात यामागील संकेत..

हिंदु शास्त्रानुसार, चुकूनही तुळशी मातेला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका.कारण हिंदू ध-र्मात अशी श्रद्धा आहे की , या दोन्ही दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी व्रत आणि उपास करीत असते, त्यामुळे जर आपण पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत भंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये.

तसेच भगवान श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय आहे,त्यामुळे श्री विष्णूच्या प्रत्येक पुजेत आणि नैवेद्दमध्ये तुळशीचे पान वाहिल्याने ते प्रसन्न होतात. तसेच तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. त्यामुळे रोज आपण आपल्या देवघरात माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू याना तुळशीची पाने अर्पण करावी.

याशिवाय पुराणानुसार, जी व्यक्ती जो माता तुळशीला दररोज दुधाने अभिषेक घालत असते, त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले स्वस्त राहत असते आणि त्याचा घरी माता लक्ष्मी नांदते. याशिवाय आपण उन्ह्याळ्यात माता तुळशीला पाणी दिल्यास, आपली सर्व पापे नष्ट होत असतात.तसेच तुलसी विवाह केल्यास, कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते व मोक्ष प्राप्ती होते.

हे वाचा:   चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ..चिमणी घरात आल्यास काय घडते ते जाणून घ्या !

माता तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते,त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून जर वारकरीच्या गळ्यात आपण तुळशीची माळ घातल्यास,तसेच वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते.
याशिवाय माता तुळशीचे आयुर्वेदिक अनेक फा-यदे आहेत.

तसेच माता तुळशीचे रोप लावल्यास, आपल्या आसपासच्या वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते, त्यामुळे हवा शुद्ध होते. तिचे पान, खोड, बी, सर्वच औषधी मानले जाते. तसेच काही मनोउपचार तज्ञाच्या मते, तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply