VIDEO: हा तर माकडा सारखा दिसतो…लुकबद्दल बोलणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवचं सडेतोड उत्तर

Uncategorized

मुंबई: मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्येही सध्या गाजणारं मराठी नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव अनेक बॉलिवूडचित्रपटांमध्ये दिसतोय. त्यामुळं देशभरात त्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. नुकताच त्याचा बालभारती हा महत्त्वाच्या विषयावर बेतलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचं कौतुक होतंय. प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतोय. अनेक मुलाखतींमध्ये तो व्यक्त होतोय. यादरम्यान, त्यानं अनेक गोष्टींवर भाष्य केलंय.

   

    एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट असा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा प्रवास आहे. मनोरंजनसृष्टीत त्याला ‘विनोदाचा बादशहा’ म्हणून ओळखलं जातं. विनोदी भूमिका म्हणजे सिद्धार्थ जाधव, हे आता पक्कं समीकरण झालंय. सिद्धार्थ गेली २०-२२ वर्षे सिनेसृष्टीत काम करतोय. पण तरी देखील त्याला त्याच्या दिसण्यावर अनेकदा ट्रोल केलं जातं, बोललं जातं. याबद्दल तो पहिल्यांदाच व्यक्त झाला. आधी मला माझ्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता , असं तो मनमोकळेपणानं सांगतोही.

    हे वाचा:   अखेर समोर आली राखी सावंतची सवत; आदिलबरोबर अफेअर करणारी तनु आहे तरी कोण?

    ‘मला काय बोलतात, माकड बोलतात ना. माकडासारखा दिसतो. मानवाची उत्क्रांती तर त्या प्राण्यापासून झालीय, तर त्याचा अंश माझ्यात आहे, त्याचा आनंद आहे. आहे तो… ते माकडही आहे माझ्यात.त्यात काय वाईट आहे’, असं सिद्धू म्हणतो.

    तसंच मी मनोरंजनसृष्टीत आल्यापासून ‘टीकेचा धनी’ आहे, असं सिद्धार्थ म्हणतो. कामाचं कौतुक होत असेल तर चांगलं वाटतं पण टीका करत असेल तर त्याचा जास्त विचार करत नाही. आता मी निवेदन करतो याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. मुळात त्याला निवेदन म्हणावं का? हा माझा प्रश्न आहे. कारण मी त्या मंचावर मोकळेपणानं व्यक्त होत असतो. मग त्याला निवेदन म्हणा, अभिनय म्हणा वा संभाषण म्हणा. जे पुरस्कार सोहळे टीव्हीवर बघायचो त्याचं आज मी निवेदन करतोय, याचा आनंद काही औरच आहे.

    हे वाचा:   प्रेम करुया 'खुल्लम खुल्ला'! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, 'त्या गोष्टी'साठी तिनं चक्क...

    तसंच आणखी एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, आधी मला माझ्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता पण जेव्हा एखादा तरुण सांगतो, की मला माझ्या परिसरतला सिद्धार्थ म्हणतात, तेव्हा कुणालातरी आपलं रूप भावलंय याची जाणीव होते. त्याहीपेक्षा बाह्यरूप कसं आहे यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्त्वाचं असतं, याची जाणीव झाली. माझा भाऊ डॉक्टर आहे त्यानं नेहमीच मार्गदर्शन केलं. उत्तम आरोग्यासाठी निर्व्यसनी असणं हा सर्वांत महत्त्वाचा मंत्र आहे. आहे तो क्षण आनंदानं जगा, हा माझा मंत्र आहे. प्रत्येकालाच तुम्ही आवडाल असं नाही, सगळं काही स्वीकारून पुढं जात राहायचं.’

    Leave a Reply