सलमान खानचा ऐश्वर्या रायच्या घराबाहेर घातला राडा; नेमकं काय घडलं होतं ‘त्या’ रात्री?

मनोरंजन

सेलिब्रिटींच्या नात्याच्या आणि ब्रेकअपच्या बातम्या अनेकदा इंडस्ट्रीत चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये आलेले काही सेलेब्स नवीन नात्याची सुरुवात करतात तर काही त्यांचं नातं कायमचं संपवतात. पण इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ब्रेकअपचा विचार केला तर या यादीत पहिलं नाव समोर येतं ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं.

   

सलमान-ऐश्वर्याच्या लव्ह लाईफपेक्षा त्यांच्या ब्रेकअपने जास्त चर्चा वाढवली. ‘हम दिल दे चुके’ या चित्रपटापासून या नात्याची सुरुवात झालीसलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची सुरुवात 1999 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातून झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्समधील जवळीक वाढू लागली.

या चित्रपटातील सलमान-ऐश्वर्याची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असतानाच सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमही वाढू लागलं. दोघांचं नातं संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनलं होतं.

हे वाचा:   20 वर्षांचे लग्न मोडून अर्जुन 15 वर्षांनी लहान असलेल्या परदेशी मुलीच्या प्रेमात पडला; लग्न न करताच बनवले आई..!

अवघ्या तीन वर्षांत ब्रेकअप झालंसलमान खानचं ऐश्वर्या रायवर खूप प्रेम होतं. त्याला अभिनेत्रीशी लग्नही करायचं होतं पण अभिनेत्री तयार नव्हती. त्यामुळे हळूहळू दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. ऐश्वर्या इंडस्ट्रीत आपलं नाव कमावत असताना सलमान बॉलिवूडचा प्रस्थापित अभिनेता बनला होता.

ऐश्वर्या आणि सलमानमधील भांडण इतकं वाढलं होतं की अवघ्या तीन वर्षांतच दोघांचं ब्रेकअप झालं.ऐश्वर्याच्या घराबाहेर एकच गोंधळ उडालाएका वृत्तानुसार, एकदा सलमान खान मध्यरात्री दारूच्या नशेत ऐश्वर्याच्या फ्लॅटवर पोहोचला.

सुमारे तीन तास सलमान खानने अभिनेत्रीच्या घराचा दरवाजा ठोठावला पण ऐश्वर्याने गेट उघडलें नाही. सलमान दरवाजा वाजवत राहिला, ऐश्वर्याने दार उघडलं नाही तेव्हा सलमान खानने अभिनेत्रीला १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर सलमानने ऐश्वर्याच्या समाजात खळबळ उडवून दिली.

हे वाचा:   सनी देओलला पाकिस्तान मध्ये आजीवन बंदी का घातली आहे, जाणून घ्या एकट्या सनी देओलने पाकिस्तान सोबत काय केले होते..

ही घटना 2002 सालची आहे, या घटनेनंतर दोघांचं नातं पूर्णपणे तुटलं.ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला होता. मात्र, ब्रेकअपनंतरही सलमान खानने ऐश्वर्या रायची साथ सोडली नाही. ऐश्वर्या रायच्या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने गोंधळ घातल्याच्या बातम्या अनेकदा येत होत्या.

Leave a Reply