श्रावण महिन्यात तुम्हाला जर असे स्वप्न पडले तर समजा होणार आहात तुम्ही धनवान.!

अध्यात्म

या पृथ्वीतलावर अतिशय पवित्र असा समजला जाणारा महिना आता सुरु झाला आहे होय आम्ही श्रावण महिन्याबद्दल बोलत आहोत. श्रावण हा भाग्याचा महिना आहे. या महिन्यात शुद्ध मनाने पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळेल. हा महिना सगळ्यांसाठीच मंगलकारक असतो निसर्ग सुद्धा हिरवा शालू परिधान करुन श्रावणमास सुरु झाल्याचे संकेत देऊ लागतो.

   

या महिन्यापासूनच सण-उत्सव सुरु होतात. या महिन्यातील प्रत्येक दिवस जणू जगण्याला नवीन उमंद देतो सगळे कष्ट आणि त्रास दूर होवून आयुष्याला झाडाप्रमाणे नवीन पालवी फुटते .मित्रांनो श्रावण महिन्यात तुम्हाला असे स्वप्न पडले तर समजून जा की आता झोपलेले भाग्य आता जागे होणार आहे. तुमचे वाईट दिवस आता गेलेच म्हणून समजा. ज्योतिष शास्त्रानुसार पुढिलप्रमाणे स्वप्ने श्रावण या महिन्यात पडल्यास तुमच्या जीवनातिल नैराश्य दूर होईल चला तर पाहूया असे कोणते आहे हे शुभ संकेत घेवून येणारे स्वप्न.

मित्रांनो श्रावण महिना हा भगवान शिव शंकर यांचा महिना मानला जातो आणि महादेवांची मनापासून केल्यास ते तुमच्यावर प्रसन्न होवून त्यांची कृपा दृष्टी तुमच्यावर ठेवतात. तुमच्या स्वप्नात जर शिव-लिंग अथवा भगवान शंकर यांची छबी दिसल्यास तुम्ही भाग्यवान व्यक्ती आहात आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळेल. तसेच तुम्ही शिव भक्त असाल तर भगवान शंकर या महिन्यात तुम्हांवर प्रसन्न होवून तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील.

हे वाचा:   आपल्या खिशामध्ये हातामध्ये पैसा राहत नाही; सतत वायफळ खर्च होतो, खिशात ठेवा फक्त हि एक वस्तू..धन खेचत राहील; वास्तूशास्त्र उपाय

या नंतरचे स्वप्न म्हणजे स्वप्नात नदीचे प्रवाह दिसणे असे प्रवाह फक्त आणि फक्त चारित्र्यवान माणसांना दिसतात. असे स्वप्न पडल्यास लग्नाच्या खूप वर्षांनी मूल-बाळ नसल्यास तुम्हाला संतान प्राप्ती होईल. तसेच वैवहिक जीवनात असलेले सगळे ताण-तणाव दूर होवून एक तुम्ही खुशहाल जीवन जगण्यास सुरवात कराल.

मित्रांनो पुढिल स्वप्न म्हणजे नाग-नागिणीचा जोड्याचे दर्शन होणे असे स्वप्न पडल्यास तुमच्यासारखा भाग्यवान व्यक्ती दुसरा नाही. या स्वप्नाच्या फल स्वरूप तुम्हाला धन-दौलत मिळेल नाग-नागिणीच्या आशिर्वादाने तुमच्या नोकरी-धंद्यात येणारे अडथळे दूर होण्यास सुरवात होईल तसेच कामात आणि विध्यार्थी जीवनात तुम्हाला यशप्राप्ती मिळेल.

जे काही अनिष्ट-संकटे तुमच्यावर येणार आहेत ती दूर होतील. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल तसेच प्रत्येक गोष्टींचा घरच्यांचा पाठिंबा ही लाभेल. मित्रांनो जर तुमचे मन साफ असेल आणि तुमच्या मनात परोपकाराची भावना असेल तर देव तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहिल. गोर-गरिबांना दान करा त्यांचे आशिर्वाद सुद्धा आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतात. फक्त आपली मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोडू नका आणि मनात देवा प्रती श्रद्धा ठेवा.

हे वाचा:   घरच्या देवघरात ठेवा ही १ मूर्ती..ज्यामुळे तुम्ही बनाल श्रीमंत ! ..घरावर होईल लक्ष्मीची कृपा..वास्तूशास्त्र उपाय

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply