ज्या महिला पीठ मळतांना ही १ वस्तू टाकून पोळी बनवतात, त्या घरात नेहमी लक्ष्मी राहते..कधीच कशाची कमी पडत नाही..

अध्यात्म

आपल्या जीवनात जर काय दुःख असेल घरात वादविवाद, भांडण, तंटे होत असतील घरात नेहमी पैश्याची चणचण राहत असेल. आपल्या तिजोरीत,पर्स, पॉकेटात खडखडात असेल आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा. हा उपाय आपण दररोज ही करू शकतो हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे.

   

जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर सोमवारी, शुक्रवारी व बुधवारी या तीन दिवशी तर हा उपाय जरूर करा. हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हे ऐश्वर्य व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य मिळते आपल्याला धन संपत्ती मिळते.

तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्र ही मजबूत होईल चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मानसन्मान मिळतो सगळीकडे आपली वाहवाही होईल व सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आणि पीठ हे सुर्याचे कारक आहे.

म्हणून जर पिठाची वस्तू आपण टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले तेज सुर्यप्रमाणे उजळून जाईल. उपाय अगदी साधा आहे हा उपाय आपण सहज दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळली जाते कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे.

प्रत्येक घराचे स्वयंपाक घर हे त्या घराचा आ त्मा असतो कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्या द्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते आपण असे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणेच आपले शरीर बनते आणि जसे आपले शरीर असते तसेच मन ही तयार होते.

हे वाचा:   तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळता ? उत्तर हो असेल तर हि माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही..बघा काय काय घडते

काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात भांडण तंटे करतात किंवा आदळआपट करतात मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात व ते अन्न खाणाऱ्याच्या मनातही तीच तरंगे निर्माण होतात. आपण जर भगवंताचे नामस्मरण करत स्वयंपाक केला तर जेवण करताना ही देवाचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते.

आज आपण बोलणार आहोत पिठाबद्दल आपण कणिक मळतो किंवा घरातील स्त्रीला कणिक मळताना पाहतो कणिक मळली गेली की स्त्री तशीच गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर आपल्या हाताच्या बोटाचे ठसे उमटवते हे आपण नेहमीच पाहतो. असे का बरं करत असतील स्त्रिया गोल गोळा करून तसच का ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पितरांसाठी मृतव्यक्तीसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ व गोलगोल केलेले असते.

त्यावर बोटे उमटवली नसतात. म्हणजे ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात त्या गोळ्याला पिंडासमान मानले जाते त्या गोळ्याला पितृ व वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक मळली की आपली 2 बोटे उटवावीत म्हणजे त्या कणकेवर पितरांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही.

त्या कणकेच्या पोळ्या देवांना नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी योग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळली की सर्वात आधी त्यावर आपल्या बोटाचे ठसे उमटवावेत त्यानंतरच त्याच्या पोळ्या कराव्यात. आता आपण पाहूयात कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी तर ज्यावेळी आपण कनिक मळतो त्यावेळी त्यामध्ये अगदी थोडेसे तूप व चिमूटभर साखर टाकावी साखर अगदी चिमूटभरच टाकावी.

हे वाचा:   श्रावण महिन्यात तुम्हाला जर असे स्वप्न पडले तर समजा होणार आहात तुम्ही धनवान.!

आपण हा उपाय दररोज करू शकतो या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबुत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील. दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी जी पोळी बनवतो ती पोळी गाईला द्यावी म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाने होईल आणि सर्व देवीदेवतांची कृपा आपल्यावर होईल.

दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्याशी ठेवावा म्हणजे आपले पितृ आपलवर प्रसन्न होतील. बहुतेक घरात सर्वात शेवटची जी चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पिढा नष्ट होते म्हणून कुत्र्याला पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो.

व शेवटची पोळी सर्व पोळ्यापेक्षा जाड बनवावी व घरातील जी गृहिणी आहे तिने ही पोळी खावी याने आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपल्या घर नेहमी अन्न धान्यांनी भरून असते. हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुख,समृद्धी व धन, संपत्ती प्राप्ती करू शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply