जर तुम्हाला श्रीमंत, धनवान व्हायचे असेल तर या झाडाचे मूळ घरात ठेवा…धनवान बनवते याचे मुळ

अध्यात्म

जर तुम्ही आर्थिक संकटात असाल किंवा मेहनत करूनही पैसा तुमच्या हातात राहत नसेल तर तुळशीची पूजा केल्याने तुमचे सर्व संकट दूर होऊ शकतात. असे मानले जाते की तुळशीचे रोप असलेले घर नकारा’त्मक ऊर्जा दूर करते.

   

जर तुम्ही ही छोटी वस्तू तुमच्या गळ्यात घातली तर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत तुळशीचा आशीर्वाद मिळेल. शास्त्रात तुळशीला पूजनीय आणि पवित्र म्हटले आहे. हे रोप प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात लावले जाते. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने अनेक दैवी आणि वैद्यकीय फायदे मिळतात.

तुळशीची वनस्पती पूजनीय आणि पवित्र आहे तसेच त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, तुळशीचे औषधी गुणधर्म कफ आणि खोकल्यापासून संरक्षण करतात, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, त्यामुळे तुळशीच्या पानांचे रोज सेवन करावे. तुळशीच्या रोपाला आपण खूप पवित्र मानतो.

असे म्हणतात की तुळशीच्या मुळांजवळ भगवान विष्णू स्वतः शालिग्रामच्या रूपात वास करतात. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्या घरातही तुळशीमातेच्या कृपेने पैश्यांची आवक चांगल्या प्रमाणात राहते.

हे वाचा:   श्री महालक्ष्मी घरात येताना देते आपल्याला हे 5 संकेत.. चुकूनही दुर्लक्ष करू नका..

तसेच तुळशीची वनस्पती तुमच्या शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती देते आणि तुमचे शरीर निरोगी ठेवते. तुळशीच्या पानांचा वापर केल्याने कोरोनासारख्या आजारांचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. तुम्हाला आम्ही असेच काही छोटे छोटे उपाय सांगणार आहोत जे पैसे कमवण्यात मदत करण्यासाठी फार उपयुक्त आहेत.

नवग्रह किंवा कुंडली किंवा शनिदोष किंवा रवी दोष अशा कोणत्याही दोषाने जर तुम्हाला त्रास होत असेल, तर तुळशीचे मूळ ताबीजमध्ये ठेवा आणि ते तुमच्या गळ्यात घाला. असे मानले जाते की यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि त्या व्यक्तीला पैशाची कमतरता देखील कधीच भासत नाही.

दुकानात किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुळशीच्या मुळाची माळ बनवून ती गळ्यात घालणे सुद्धा भरपूर फायदेशीर ठरते. दररोज स्नान केल्यानंतर तुळशीच्या मुळास जल अर्पण केल्याने नवग्रहाचे दोष दूर होतात. माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दूर होऊ लागते.

हे वाचा:   मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींविषयी संपूर्ण माहिती...बघा कसे असतात हे लोक

धनप्राप्तीसाठी तुळशीचे मूळ चांदीच्या ताबीजात ठेवावे. यामुळे संपत्तीचे सर्व मार्ग खुले होतात आणि माणूस लवकर श्रीमंत होतो. तसेच तुमच्या मार्गात येत असणारे सर्व अडथळे देखील सहज दूर होतील. तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सुद्धा या आधी आढळून आले आहेत.

यामुळे तुमच्या शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते आणि तुमचे शरीर निरोगी देखील राहते. असे मानले जाते की आपल्या घराच्या अंगणामधे तुळशीचे रोप लावल्यास त्या घरात असलेल्या किड्या कीटकांचा त्रास हा खूप कमी होतो. यामुळे किड्यावर तुम्ही करत असलेल्या उपचाराचा खर्च देखील बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

दररोज आंघोळ केल्यानंतर तुळशीच्या मुळापासून तिलक घेऊन तो तिलक कपाळावर लावावा. यामुळे व्यक्तीची संमोहन शक्ती वाढते. समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावर लगेच प्रभाव पडतो. तसेच तुळशीच्या झाडाच्या मुळाची माती घेऊन तिळक लावल्याने मन नेहमी शांत राहते आणि दु:ख देखील लवकर दूर होतात

Leave a Reply