या पानांचा हा काढा; गुडघेदुखी, सांधेदुखी, कोणतेही दुखणे असो तात्काळ आराम मिळेल ! खूपच फायदेशीर असा घरगुती साधा सोपा उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आपण जो आज काढा बनवणार आहोत याचा सेवनाने अगदी चालूही शकत नाही तो पळू लागेल. कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, आखडलेल्या नसा यावर 100% रामबाण उपाय आहे. जो चालूही शकत नाही. त्रस्त आहे कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी यांने त्यांना नक्कीच आराम मिळणार आहे. अगदी दोन-तीन दिवसांमध्ये.

   

मित्रांनो सांधेदुखीची आजार आहे तो कसा होतो ? शरीरामध्ये वात रोग निर्माण होतो आणि हा वात रोग सांध्यांमध्ये पोहचला कि साध्या मधलं वंगण कमी होत. वंगण कमी झाल्यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात आपटतात घासतात आणि त्यामुळे खूप वेदना होतात. या वेदनेला मरण यातना म्हटलं तरी चालेल. या वेदनेतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय माहीत करून घेणार आहोत.

मित्रांनो, हे औषध कसे तयार केलेला आहे किंवा घ्यायचं कोणी घ्यायचं नाही कोणी कोणता पदार्थ टाकायचं नाही याची सविस्तर माहिती पाहुयात.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला तमालपत्र सुंठ आणि ओवा हे तीन पदार्थ लागणार आहेत. सुंठ म्हणजे सुकवलेले आले. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. खूप सर्दी झाली असेल नाक चोंदले असेल वा गळत असेल तर सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कोमट करून नाकावर व कपाळावर घातल्यास आराम वाटतो.

मित्रांनो आपल्याला सुंठीची बनवायचे आहे. वात संतुलित करण्याचं काम सुंठ करत असते. वायू रोगावर गुणकारी आहे. गॅसेस, अपचन अशा समस्या दूर करण्याचे काम सुद्धा सुंठ करत असते.

हे वाचा:   काखेतील काळी पडलेली त्वचा या उपायाने सुंदर व गोरीपान करा..अगदी सोपा उपाय..खास मुलींसाठी

मित्रांनो, या उपायासाठी सुंठीची अर्धा चमचा पावडर लागणार आहे. तर दुसरा पदार्थ लागणार आहे ओवा. हिंदीमध्ये अजवाइन म्हणतात. आतडी साफ करण्याचे काम ओवा करत. पचनसंस्था व्यवस्थित करणे पोटाचे विकार गायब करण्याचे काम करत असतात आणि वात रोग नियंत्रित करण्याचे काम सुद्धा ओवा करतो.

तुमच्या शरीरांमध्ये फॅट म्हणजे चरबी जमा झालेली असेल तर ते विरघळायचं काम सुद्धा ओवा करत. म्हणून या सर्वच आजारावर आपल्या आहारामध्ये किंवा आपण जेवण झाल्या नंतर कधीतरी ओवा खायला पाहिजे.

मित्रांनो, तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तेजपत्ता म्हणजेच तमालपत्री. मसाल्याचा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. डायबिटीस किंवा शुगर असणाऱ्या लोकांनी तमालपत्रीचे सेवन केले पाहिजे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्याचे काम तेज पत्ता करतो तसेच पोट साफ करणं. वायू रोगांपासून आपलं संरक्षण करणं तसेच जर वात रोगापासून संरक्षण होते आणि त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे आजार, कंबर दुखी, आखडलेल्या नसा अशा समस्या दूर होतात.

मग आपण तीन पदार्थ घेतले आहेत अर्धा चमचा सुंठ पावडर एक चमचा ओवा आणि दोन ते तीन तेज पत्ता. एका भांड्यात दोन कप पाणी घ्या त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची त्यानंतर आपण एक चमचा ओवा टाका आणि तमालपत्री च्या दोन पानांचे तुकडे टाका.

हे वाचा:   तंबाखू खाण्याची आणि सिगरेट पिण्याची सवय मोडा आता फक्त सात दिवसात; १००% रिजझल्ट वाला घरगुती उपाय

हे पाणी इतके उकळा की, दोन कपाचे एक कप पाणी शिल्लक राहील. हा काढा गाळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता. मात्र मधुमेह असलेल्या लोकांनी मात्र यामध्ये गुळ टाकू नये हा काढा सकाळी अनुशापोटी उपाशीपोटी आपल्याला कोमट घ्यायचा आहे. आपल्याला घोट घोट करून काढा आपल्याला सावकाश प्यायचा आहे. हा उपाय सलग तीन ते चार दिवस करा.

ज्या लोकांना सकाळी उपाशीपोटी काढा प्यायला जमणार नसेल त्यांनी सायंकाळी हा काढा प्यायला तरी चालेल. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता. हा उपाय रामबाण आहे जो अगदी म्हाताऱ्या माणसांना होणाऱ्या सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास होतो तो पळून जाईल. परंतु अगदी कमी वयामध्ये सुद्धा अनेकांना कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी आदी समस्या आढळतात, नसा आखडलेल्या असतात. या उपायामुळे या सर्व समस्या दूर होतील. सांधेदुखी संधीवातापासून तुमचं संरक्षण होईल म्हणून हा साधा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply