घरावर कधीही कसले संकट आल्यास इथे लावा 1 दिवा संकट दूर होईल..घरातील सर्व नजरदोष, काळी जादू, रोग त्वरित निघून जाईल..

अध्यात्म

अनेकदा घरात एकामागून एक संकटे येतात, कितीही काहीही केलं तरी ते आपला पाठलाग करत असतात, अशा वेळी मन खचायला होतं. खूपच अस्वस्थ व्हायला होते. काही सुचत नाही. आपल्या हिंदू ध र्म शास्त्रात काही असे पौराणिक उपाय आहेत, प्राचीन उपाय आहेत जे करून आपण आपल्या घरातील वाईट परिस्थिती चांगली बनवू शकतो, संकटांना तोंड देऊ शकतो.

   

तसेच घरातील खूप साऱ्या गोष्टी आपण पूर्ववत चांगल्या करू शकतो. अशा उपायांमुळे आपल्याला थोडा धीर येतो व संकटांना तोंड देण्यासाठी बळ वाढतं. आपल्या हिंदू ध र्म संस्कृती नुसार आपल्याला अनेक उपाय सांगितले जातात जे आपण आपल्या भाग्यासाठी सुद्धा करू शकतो.

आपल्या हिंदू ध-र्मात नंदादीप म्हणजेच साक्षात ईश्वराचे रूप असणारा, सतत तेवत राहणारा दिवा होय. असा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरात, मनात शांती निर्माण होते. चंचलता कमी होते. एक मातीचा स्वच्छ दिवा घ्या, त्यामध्ये शक्यतो तिळाचे तेल घाला.

हे वाचा:   हे 7 संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात...असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकरच श्रीमंत होणार

एक वात व तिळाच्या तेलाने हा दिवा, नंदादीप प्रज्वलित करा. त्यांनंतर दिवा हा नेहमी आसनावर ठेवावा, कारण तो ईश्वराचे रूप मानला जातो. त्यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या, पाने, एखादं पात्र वापरू शकता, जेणेकरून दिवा खाली ठेवला जाणार नाही. हा दिवा प्रज्वलित केल्यावर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता वाटेल.

हा नंदादीप सतत तेवत ठेवायचा आहे. हा नंदादीप तुम्ही तुमच्या घरातील चारही कोपऱ्यात ठेवू शकता. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करत नाही, दिवा जरी विझला तरी त्याची चिंता न करता पुन्हा लावा व सतत तेवत ठेवा. भाग्याचा उदय असे नंदादीप ला म्हणले जाते.

शास्त्रात याला फार महत्व आहे. हा दिवा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. आपल्या घरातील संकटांवर अडचणींवर मात करण्यासाठी एक ईश्वरी मार्गदर्शक म्हणून हा दिवा कार्यरत असतो. आपल्या पुराणात याचे खूप महत्व आहे. असे काही पौराणिक उपाय आपले भाग्य बदलण्यासाठी मदत करत असतात.

हे वाचा:   अगदी सोप्या उपायाने पितृदोषापासून कायमची सुटका मिळवा..कधीच कोणता त्रा स होणार नाही..श्री स्वामी समर्थ

आपल्या सर्व मंदिरात नंदादीप हा नेहमीच तेवत असतो, त्यामुळेच तर तिथे इतकी सारी दिव्य शक्ती, सकारात्मकता भरलेली असते व त्यामुळे आपल्याला अतिशय प्रसन्न वाटते. हा नंदादीप घरातील चार कोपऱ्यात चार व पाचवा देव्हाऱ्यात लावावा. या दिव्याची वात उत्तर किंवा पूर्व दिशेला करावी. त्यामुळे घरातील भरभराटी वाढते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply