अजब प्रकरण! 2 विवाहित महिलांचं एकमेकींच्या पतीवर जडलं प्रेम; शेवटी घेतला असा निर्णय की सगळेच शॉक

Uncategorized

चार लोकांचं एक अतिशय अजब प्रेमप्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील आहे. या घटनेमध्ये दोन कपलचा समावेश आहे. या कपलमधील दोन्ही महिला एकमेकींच्या पतीच्या प्रेमात पडल्या आणि मग त्यांनी लग्नही केलं. या प्रकरणातील घटनांच्या अनपेक्षित वळणाने लोकांना आश्चर्यचकित केलं. रिपोर्ट्सनुसार, पसराहा गावातील रहिवासी असलेल्या रुबी देवीचं 2009 पासून नीरज कुमार सिंहसोबत लग्न झालं असून त्यांना चार मुलं आहेत.

   

या जोडप्याच्या शांततापूर्ण जीवनाला धक्कादायक वळण तेव्हा मिळालं जेव्हा रुबीचं तिच्याच गावातील एक पुरुष मुकेश कुमार सिंह याच्यावर प्रेम जडलं. विशेष बाब म्हणजे मुकेश विवाहित होता आणि त्याच्या पत्नीचं नावही रुबी देवी होतं. अखेरीस, रुबी (नीरजची पत्नी) आणि मुकेश यांनी त्यांच्यासोबत दोन मुलं आणि एक मुलगी घेऊन पळून जात फेब्रुवारी 2022 मध्ये एकमेकांशी लग्न केलं.

हे वाचा:   बिग बींच्या घरात ही अभिनेत्री आहे भाडेकरु, सामान्य माणूस घरासाठी जितकं लोन काढतो तितकं एका महिन्याचं भाडं

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रुबी (जिचं लग्न नीरजशी झालं होतं) मुकेशसोबत पळून गेल्यानंतर घडलेल्या घटना अतिशय धक्कादायक होत्या. काही रिपोर्ट्सनुसार नीरज या लग्नानंतर नाराज होता आणि त्याने मुकेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत बोलावली, पण मुकेश याने त्यांचा निर्णय पाळला नाही. एका रिपोर्टनुसार नीरजने मुकेशच्या पहिल्या पत्नीसोबत संबंध ठेवून बदला घेण्याचा प्रयत्न केला.

इतर रिपोर्ट्सनुसार, नीरज कसा तरी मुकेशची पहिली पत्नी रुबी देवीशी संपर्क साधण्यात यशस्वी झाला आणि दोघे नियमितपणे बोलू लागले. अखेरीस, ते प्रेमात पडले आणि 11 फेब्रुवारी रोजी म्हणजे दोघांच्या जोडीदारांनी त्यांना सोडून दिल्याच्या एका वर्षानंतर त्यांनी दोघांनीही एकत्र घर सोडून पळ काढला. 18 फेब्रुवारी रोजी दोघांनी कोर्टात लग्न केलं. दोन्ही जोडपी मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात गेल्यानंतर अखेर हे गुंतागुंतीचं प्रेमप्रकरण संपलं आणि चौघांनीही आपल्या पसंतीनुसार विवाह केले. नीरज हा टाटा कंपनीत काम करतो, तर मुकेश हा रोजंदारी मजूर म्हणून काम करतो. विशेष बाब म्हणजे नीरजने मुकेशच्या दोन्ही मुलांना दत्तकही घेतलं आहे.

Leave a Reply